विषारी साप चावल्यावर त्यावर उतारा वा उपाय म्हणून प्रतिविष टोचावे लागते. हे प्रतिविष भारतात ‘हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई’ या संस्थेत तयार केले जाते. या प्रतिविषामुळे सर्पविषाचे उदासिनीकरण होते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हे प्रतिविष १० मिली. शिरेतून लवक्ररात लवक्रर द्यावे. एका तासाने तिच्यात विषबाधेची लक्षणे आढळत असल्यास पुन्हा प्रतिविषाची दुसरी मात्रा द्यावी. फुरसे चावल्यास सर्पदंशाच्या जखमेभोवती थोडे प्रतिविष टोचावे लागते, त्यामुळे जखम चिघळत नाही. विषबाधेची लक्षणे जोपर्यंत आढळतात, तोपर्यंत दर दोन तासांनी प्रतिविषाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) द्यावी लागतात.
प्रतिविष तयार करताना तगड्या घोड्यांना नाग, मण्यार, घोणस व फुरसे यांचे सौम्य विष विद्राव म्हणून टोचतात. त्यामुळे घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके (अँटिबायॉटिक) तयार होतात. ती सर्पविषाचा परिणाम नष्ट करू शकतात. घोड्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके तयार झाल्यावर अशा घोड्याचे रक्त काढून यातून रक्तद्राव वेगळा करतात. हा द्राव सुकवितात. त्याची भुकटी (पावडर) तयार करतात. ही भुकटी सर्वसाधारण तपमानात ५-६ वर्षे उपयोगात आणता येते. १० मिली.च्या काचेच्या कुपीतून ती दवाखान्यात उपलब्ध असते. ॲलर्जी असलेल्या व्यक्तीस प्रतिविष टोचल्यास अगोदर ॲड्रेनॅलीन हे औषध टोचावे लागते.
सर्पदंश कसा टाळावा
सर्पदंश टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी : (१) रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. (२) अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे; त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. (३) साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता असते. (४) घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. (५) घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील,तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. (६) घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये, केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात. (७) झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये. (८) मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात. (९)जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत
प्रतिविष तयार करताना तगड्या घोड्यांना नाग, मण्यार, घोणस व फुरसे यांचे सौम्य विष विद्राव म्हणून टोचतात. त्यामुळे घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके (अँटिबायॉटिक) तयार होतात. ती सर्पविषाचा परिणाम नष्ट करू शकतात. घोड्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके तयार झाल्यावर अशा घोड्याचे रक्त काढून यातून रक्तद्राव वेगळा करतात. हा द्राव सुकवितात. त्याची भुकटी (पावडर) तयार करतात. ही भुकटी सर्वसाधारण तपमानात ५-६ वर्षे उपयोगात आणता येते. १० मिली.च्या काचेच्या कुपीतून ती दवाखान्यात उपलब्ध असते. ॲलर्जी असलेल्या व्यक्तीस प्रतिविष टोचल्यास अगोदर ॲड्रेनॅलीन हे औषध टोचावे लागते.
सर्पदंश कसा टाळावा
सर्पदंश टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी : (१) रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. (२) अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे; त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. (३) साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता असते. (४) घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. (५) घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील,तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. (६) घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये, केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात. (७) झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये. (८) मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात. (९)जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत
No comments:
Post a Comment