नमस्कार मी बापूसाहेब सोनवणे आपले स्वागत करतो.



सुस्वागतम शैक्षणिक माहितीबरोबरच इतरही अनेक प्रकारची माहिती देणाऱ्या या व्यासपीठावर आपले स्वागत आहे.

Sunday, 7 February 2016

गवा

गवा [ Indian Gaur / Indian Bison ] या भिमकाय शाकाहारी प्राण्याबद्दल….

जंगलातल्या खूरवाल्या प्राण्यांमध्ये सर्वात ताकदवान नी वजनदार म्हणुन गणल्या जाणाऱ्या गवा अर्थात गवारेडा [ Bos gaurus gaurus ] या प्राण्याबद्दल आपण बऱ्यापैकी अनभिद्न्य असतो. साधारणपणे पुर्ण वाढीचा म्हणजेच ’माजलेला’ नर साडेसहा फ़ुटापर्यंत वाढतो नी वजनाचा विचार करायचा तर एक टनापर्यंत असलेला हा “वजनी” नग १००% शाकाहारी आहे हे सांगुनही अनेकांना पटत नाही. गम्मत म्हणजे गवा हा आपल्या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांच्या बोव्हिडी कुटुंबाचा [ Family Bovidae ] सदस्य आहे. या गटात बहुतेक खूरवाल्या प्राण्यांना वरच्या जबड्यात म्हणजेच पटाशीचे दात नसतात आणी मस्त शिंगे असतात. गव्याच्या शिंगांचा विचार करायचा झाला तर, नराला साधारण ४०/४५ इंचांपर्यंत अर्धचंद्राकृती शिंग असतात. मादीची शिंग त्यापेक्षा थोडी कमी लांबीची असतात. ही शिंग अर्थात क्याल्शीयमची बनलेली असतात ज्यांचा रंग बहुतांश पिवळट हिरवट असतो नी टोकाला काळा असतो.
gaur4
गवा हा शब्द जरी उच्चारला तर आपल्या नजरेसमोर त्याच बलदंड पिळदार शरीर येतं. याच कारण म्हणजे त्याच्या शरीराची नैसर्गीक ठेवण ! सहा साडेसहा फ़ूट वाढणारा हा प्राणी तसा लाजाळू असतो. जन्मत: मातकट तपकिरी रंगाचे गवे वाढत्या वयाबरोबर तुकतुकीत काळे होत जातात. शरीराच्या मानाने यांच डोकं लहानच म्हणावं असं असतं. या लहान डोक्यावर, म्हणजेच कपाळावर लहानसा पसरट खळगा असतो ज्यापासून एक उभार [ ridge ] सुरु होवुन मानेपर्यंत गेलेला असतो. गव्याचे कान हे मोठे असतात पण बहुतेक सर्व गायी गुरांप्रमाणे फ़ार तिक्ष्ण नसतात. त्याच बरोबर याची दृष्टीही तिव्र नसते. मात्र या कमतरतेला तिव्र गंधद्न्यान भरून काढतं. गव्यांची घ्राणेंद्रीये फ़ारच तिक्ष्ण असतात व वाऱ्याच्या लहानसहान झुळुकांबरोबर येणारा प्रत्येक गंध ते हुंगतात. गव्याचे पाय त्याच्या शरीराच्या मानाने बारीक वाटले तरी दणकट असतात. त्याच्या वजनी शरीराचा भार पेलायची भक्कम कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. या पायांच वैशिष्ठ्य म्हणजे हे गुढघ्यापर्यंत पांढरट रंगाचे असतात. जणूकाही गव्याने पांढऱ्या रंगाचे मोजे घातले आहेत असाच भास होतो. त्याची शेपटीमात्र त्यामानाने लहान या सदरात मोडते. हिचा बहुतेक उपयोग गवत चरताना शरीरावर बसणाऱ्या किड्यांना हकलण्यासाठीच केला जातो.
gaur2Gaur 1
आधी उल्लेखल्याप्रमाणे, गवा हा १००% शाकाहारी असतो. हे गवे मुख्यत्वे गवत, झाडांची पाने, कोवळे कोंब आणि रानफ़ळे खातात. या खाण्यासाठी ते दिवस रात्र जंगलात फ़िरतात. पहाटे आणि संध्याकाळी गवे चरायला बाहेर पडतात. पण मनुष्यवस्ती जवळच्या जंगलात मात्र गवे रात्री बाहेर पडतात. साधारणत: गवे १० ते १२ च्या कळपात दिसून येतात. हा कळप आकाराने मोठ्या असलेल्या नराच्या अधिपत्याखाली असतो ज्यात काही माद्या व पिल्ले असतात. मोठे झालेले नर आणि वयोवृद्ध नर [ज्यांना एकल म्हणतात] एकेकटे फ़िरतात.प्रत्येक कळपाची आणि एकांड्या नराची स्वत:ची ७०/७५ किलोमिटर्स एवढी हद्द असते ज्यात दुसरे गवे घुसत नाहीत. साधारंण डिसेंबर ते जूनपर्यंत यांचा प्रजननाचा काळ समजला जातो. सर्वात ताकदवर, अर्थात आकाराने मोठा नर सर्वप्रथम कळपातील माद्यांबरोबर समागम करण्याचा अधिकार मिळवतो. समागमानंतर साधारण २७० ते २८० दिवसांच्या गर्भारपणानंतर मादी एकाच पिल्लाला जन्म देते. जन्मत: साधारण २५ किलो असलेल्या ह्या पिल्लाची पुढील नऊ महिने आईकडून काळजी घेतली जाते. वयाच्या २ ते ३ वर्षात हे गवे प्रजननासाठी तयार होतात. मात्र माद्या दोन बाळंतपणांमध्ये साधारण दिड वर्षाचा खंड ठेवतात.

आज जगभर गव्याच्या तीन जाती आढळतात. भारतिय बायसन अर्थात [ Bos gaurus gaurus ] हा भारतिय उपखंडात आढळणारा गवा, थायलंड आणि मलेशिया इथे आढळणारा ’सेलडंग किंवा मलायन गौर [Bos gaurus hubbacki ] जो गव्यांची सर्वात लहान जात म्हणुन ओळखला जातो आणि म्यानमार ते चायना ह्या पट्ट्यात आढळणारा ‘साऊथ इस्ट अशियन गौर’ [ Bos gaurus laosiensis ] जो गव्याची सर्वात मोठी जात म्हणुन ओळखला जातो. ह्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतिय बायसन सर्वात जास्त संख्येन आढ्ळतात. पण शेवटचा गवा [ Bos gaurus laosiensis ] मात्र दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . गवे तसे लाजाळू सदरात मोडत असले तरिही चक्रमच म्हणावे असे वागतात. त्यांच्या तिरसटपणाच्या अनेक सुरस कथा निसर्ग निरिक्षकांमध्ये ऐकवल्या जातात. निसर्गत: २५-३० वर्षाच आयुष्य जगणाऱ्या गव्यांना त्यांच्या आकारामुळे आणि ताकदीमुळे जंगलात शत्रु कमीच असतात. गव्याचे मुख्य शत्रू म्हणुन वाघ, सुसरी आणि मनुष्यप्राण्याकडे बोट दाखवता येऊ शकते. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे , हे गवे तोंडाने मजेशीर आवाज काढतात. प्रजननाच्या काळात गवे तोंडाने शीळ घातल्यासारखा आवाज काढतात. हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकायला जातो. या आवाजाव्यतिरीक्त गवे तोडाने डुरकल्यासारखा काढतात जो कळपासाठी धोक्याचा किंवा एकत्र येण्याचा ईशारा असतो.

गवे मुख्यत: डोंगराळ भागातील जंगले, गवताळ भागात आणि टेकड्यांमध्ये आढळतात. दिवसेनदिवस कमी होत जाणाऱ्या निवासाच्या सुरक्षीत जागा आणि अन्नासाठी करावी लागणारी भटकंती यामुळे गव्यांना धोका निर्माण होतोय. आपल्या देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक सारख्या राज्यांमधे यांच्यासाठी खास राखीव अभयारण्ये बनवली गेली आहेत.

सारंग हरीण

सारंग हरीण

हरीणांचे मुख्य उपकुळ सारंग हरीणे हा सस्तन प्राण्यांमधील एक कुळ आहे. यातील प्राणी हे मुख्यत्वे पायात खुर असतात व त्यांचे खुर विभाजीत अथवा दोन टाचांवरचे असतात. हरीणांचे दोन मुख्य उपकुळे आहेत. सारंग व कुरंग ही दोन्ही हरीणे दिसावयास सारखी असली तरी दोन्ही मध्ये मूलभूत फरक आहे. मुख्य फरक हा शिंगामध्ये असतो.

शिंगे

सारंग हरीणांची शिंगे ही त्यांचे वैशिठ्य आहे. शिंगे ही फक्त नरांना असतात. त्यांची शिंगे ही भरीव असतात व अनेक टोक असतात. पुढे एक टोक असते व मागील बाजुस अनेक टोक असतात. मागील बाजूस दोन किंवा अधिक टोकांची संख्या असते. सांबर व चितळांमध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात. ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. शिंगाची वाढ होत असताना त्यावर मखमलीचे आवरण असते. त्यामध्ये रक्तवाहिन्याचे जाळे असते. या काळात हरीणे इतर नरांशी संघर्ष टाळतात. शिंगाची पुर्ण वाढ झाल्यावर मखमलीचे आवरण वाळून जाते व पोपडे पडतात. या काळात नर हरीणे झाडांवर व दगडांवर आपली शिंगे घासून ही पोपडे काढून टाकतात व वीणीच्या हंगामासाठी तयार होतात. वीणीच्या हंगामात नर हरीणे इतर हरीणांशी संघर्ष करण्यात उत्सुक असतात. एकमेकांशी शिंगे अडकवून नर एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम विजयी नर मादीचा अधिपती होतो. असे नाही की सर्वच नरांना शिंगे असतात. काहिंना नसतात अशी हरीणे साहजिकच मादीच्या कळपावर हक्क सांगण्यास असमर्थ असतात. परंतु काही शिंगरहीत नरही वेगळे डावपेच वापरून इतर नरांना आवाहन करत असतात.


शिंगे नसलेली हरीण मादी पिलू
वावर

सारंग हरीणे ही बहुतांशी अमेरिका अशिया व युरोप खंडात आढळून येतात. अफ्रिकेत प्राण्याचे वैविध्य प्रचंड असले तरी तिथे सारंग हरीणे नाहीत ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सारंग हरीणे ही मुख्यत्वे दाट ते घनदाट जंगलात आढळतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा वावर नसल्यात जमा आहे.

यात खालिल हरीणांचा समावेश होतो

सांबर
चितळ
भेकर
बाराशिंगा
थामिन
रेनडियर
काश्मिरी हंगूल
कस्तुरी मृग
पिसोरी
दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात
त्यामुळे नागाचे विष हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे
आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या
भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे
माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा
नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने
झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम.
आपली हालचाल कमीत
कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर
रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या
विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश
हे जीवघेणे नसतात काही वेळा
कोरडा दंश देखिल होउ शकतो. साधारणपणे १० टक्के
नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे
मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural
systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत
मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू
शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश
झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू
शरीराचे इतर भाग असंवेदनशील
होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा
भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात
पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास
असमर्थ होतात. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे
नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने
जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते
दीड दिवसापर्यंत जाऊ शकतो.

दुर्मिळ तस्कर साप

माळढोक

⁠⁠⁠वैशिष्टे (Characteristics)- जगभरात माळढोकच्या एकूण २२ प्रजाती आढळतात. त्यापैकी एक ‘द ग्रेट इंडियन बस्टर्ड’ म्हणजे आपल्याकडे आढळणारा माळढोक. 
माळढोक पक्ष्याच्या मराठी नावातच त्याच्या निवासचं ठिकाण समावलंय. माळरानावर रहाणारा हा मोठा पक्षी खरंतर माळरानाची शान म्हणावा असाच आहे. ’ओटिडिडाइ’ कुटुंबातल्या (Otididae) ह्या सदस्याला आपल्यामुळेच आज नामशेष व्हायची वेळ आली आहे. मोकळ्या रानमाळ, गवताळ जमिनी आणि साधारण शेतीच्या सान्निध्यात रहाणारे हे पक्षी गिधाडांपेक्षा थोडे मोठे असतात. साधारण लहान शहामृगाच्या आकाराएवढा हा पक्षी असतो
त्यातच, निसर्गाचा वरदहस्त असलेल्या महाराष्ट्रात केवळ सहा माळढोक पक्षी उरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधीच जगातील अतिदुर्मिळ प्रजातींमध्ये गणल्या जाणारी माळढोक प्रजाती आता राज्यातून नामशेष होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरातील माळढोक पक्षी अभयारण्यात केवळ चार तर, अहमदनगर येथे दोन माळढोक पक्षी असल्याचा अंदाज बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा परिसरात माळढोक पक्ष्यांची संख्या ३ किंवा ४ असावी, तर सोलापुरातील नान्नज येथील माळढोक अभयारण्यात ही संख्या २ किंवा ३ असावी. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील परिस्थिती पाहता येथील माळढोक पक्ष्यांची संख्या ४ किंवा ५ असावी असा अंदाज व्यक्त करून गुजरातमध्ये स्थिती थोडी बरी असून, तिथे अवघे १५ माळढोक पक्षी उरल्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातून मात्र माळढोक पक्षी नामशेष झाला आहे. गवताळ प्रदेश हा माळढोक या पक्ष्याचा नैसर्गिक अधिवास असून तोच नाहीसा झाल्याने या देखण्या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत पुरेशी जनजागृती केली जात नसल्याने माळढोक पक्षी दिवसागणिक कमी होत आहेत. एकेकाळी या पक्ष्यांच्या प्रेमात पडलेल्या ब्रिटिश अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात शिकार केल्याने माळढोक पक्ष्यांची संख्या घटली. स्वातंत्र्य काळानंतरही या पक्ष्याचे मांस रुचकर लागते असा गैरसमज असल्याने याची अतोनात शिकार होत गेली.
दरम्यान, राजस्थानात अद्यापही विविध भागांत माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व दिसून येते. ‘राजस्थान सरकारच्या पुढाकाराने सुरू असलेल्या ‘सेव्ह बस्टर्ड’ या प्रकल्पामुळे आशा पल्लवीत झाल्या असून, या प्रकल्पात माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनांवर वनविभागाकडून समाधानकारक लक्ष ठेवले जात आहे. या प्रकल्पांतर्गत गवताळ प्रदेशाचे संवर्धन, लोकसहभागातून जनजागृती आणि माळढोक पक्ष्याची नित्यनेमाने मोजणी सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत वनविभागालाही सरकारकडून प्रेरणा मिळत असून अशा प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रातही राबवला जावा,’ अशी इच्छा विविध निसर्गप्रेमींनी व विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.
माळढोक पक्ष्यांची घटती संख्या हा आता गंभीर विषय झाला असून, यापुढे त्यांच्या संरक्षणाबरोबरच संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन पद्धती स्वीकारावी लागेल. त्याशिवाय माळढोक वाचणार नाहीत. परदेशातही कृत्रिम पद्धतीने प्रजनन करून माळढोकांची संख्या वाढविण्यात यश आले आहे. 

कायदा (Law)- वन्यजीव (संरक्षण) अधिनियम कायद्यानुसार माळढोक या पक्ष्याचा अनुसुची १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. या पक्ष्यास पकडणाऱ्या, मारणाऱ्या वा त्यांचा अधिवास नष्ट करणाऱ्या व्यक्तीस ३ ते ५ वर्ष कारावास व २५००० रुपये दंड होऊ शकतो. तसेच या पक्ष्यांची वा त्यांच्या अवयवाची विक्री वा तस्करी करणाऱ्यास ५ ते ७ वर्ष कारावास व ३०००० रुपये दंड होऊ शकतो. तरी असे काही गैरप्रकार होत असल्याची कोणाला काहि खात्रीशीर माहिती असल्यास त्वरीत वनविभागाशी संपर्क साधावा हि विनंती. वनपरीक्षेत्र पुणे. फोन- ०२०२४४७२९८९. 

Saturday, 6 February 2016

विषारी व बिनविषारी साप ओळखणे

[2:56 PM, 2/6/2016] +91 99223 26183: विषारी व बिन विषारी साप ओळखण्याची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्या सापामध्ये विषग्रंथी व विषदंत आहेत काही होय. भारतातील महत्त्वाचे विषारी सापखालील खुणांवरून ओळखता येतात.
(१) समुद्र साप : शेपटी दोन्ही बाजूंनीच पटी असते. (२) फुरसे (व्हायपर) : उदर शल्क मोठे, डोके त्रिकोणी आकाराचे व त्यावर लहान शल्क, डोळे व नासिका यांधील भागावर लोरियल शल्क अथवा खाच असते. (३) नाग : नासिका आणि डोळ्यांना स्पर्श करणारे तिसरे ऊर्ध्व ओष्ठ शल्क व फण्यासह मान असते. (४) मण्यार : काळसर रंग, पृष्ठमध्य शल्क मोठे व षट्‌कोनी तर पुच्छशल्क अखंड असते.
आ.२. विषदंत व विषग्रंथी दाखविणाऱ्या फुरसे सापाचा जबडा : (१)विषदंत, (२) विषदंताचा आतील बाजूस वळलेला पोकळभाग, (३) विषदंतावरील आवरण, (४) विषनलिका, (५) विषग्रंथी, (६)आतीलबाजूसवळलेलेदंत, (७)जीभ.
विषसाधन : विषारी सापाच्या वरच्या जबड्यात विष ग्रंथीव विषदंत असतात, यांस ‘विषसाधन’ म्हणतात. लालाग्रंथीचे रूपांतर विषग्रंथीत झालेले असते. विषग्रंथी डोळ्यांच्या मागील बाजूस असतात. या विषग्रंथींपासून निघालेल्या विषनलिका वरच्या जबड्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या विषदंतांत उघडतात. विषदंत दोन असून ते जबड्यातील इतर दातांपेक्षा मोठे, पोकळ व आतील बाजूस वळलेले असतात. नागाचे विषदंत उभे तर फुरशाचे आडवे असतात. काही कारणाने विषदंत पडले, तर नवीन विषदंत तयार होतात.
दंश करण्यापूर्वी साप डोके उंच करून शरीर थोडे मागे घेतो व क्षणार्धात भक्ष्य किंवा शत्रूचा चावा घेतो. साप चावा घेताना विषदंताच्या साहाय्याने विषग्रंथीतील विष भक्ष्य किंवा शत्रूच्या शरीरात सोडतो. विष सोडताना खालचा जबडावरच्या दिशेने ओढला जातो. चावा घेताना जबड्याच्या हालचालीसाठी कवटीतील अस्थी व स्नायूयांची मदत होते. भक्ष्याच्या किंवा शत्रूच्या शरीरात विष सोडल्यावर सापाच्या मानेचे स्नायू शिथिल होतात व तो विषदंत बाहेर खेचून घेतो.
सापाच्या विषग्रंथीतील विष एका चाव्यात संपत नाही. तो अनेक चावे घेऊ शकतो. नागाचे विष फिकट पिवळसर, पारदर्शक व काहीसे चिकट असते. फुरशाचे विष कधी पिवळसर तर कधी पांढरे असते. या विषामुळे भक्ष्य बेशुद्घ पडते. त्यामुळे सापाला भक्ष्य पकडून खाणे सोपे जाते. विष पचनास मदत करते. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी सापाला विषाचा उपयोग होतो. विषारी सापाच्या पिलांमध्ये जन्मतः पहिल्या दिवसापासून विष असते. सुमारे ६५% सर्पदंश रात्री आणि ३५% दिवसा झाल्याचे..
🐍🐍🐍🐍सर्पमित्र बापुसाहेब सोनवणे
[3:03 PM, 2/6/2016] आबाजी पोखरकर: 👌🏻👌🏻👌🏻
[3:03 PM, 2/6/2016] +91 93718 28156: 👍👍 nice info.





सापाविषयी माहिती - समज गैरसमज
समज: नाग आणि इतर साप वेगळे आहेत. नाग हा साप नाही.
सत्य: नाग हा ही एक सापच आहे. सापाचे सर्व गुणधर्म नागात आहे. जातीनुसार त्यात कमी अधिक प्रमाणात फरक आहे. त्यात विषाचे प्रमाण सर्वात अधिक व प्राणघातक असते.
समज: साप दूध पितो. तो गाईच्या सडाला तोंड लावून दूध पिल्याच्या आख्यायिका.
सत्य: साप दूध पित नाही.दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. त्याला रानावनात दूध मिळू शकत नाही. तो दूध पचवूच शकत नाही. चुकून दूध पिला तर त्याला त्रास होईल. गाईच्या सडाला तोंड लावून दूध पितो ही निव्वळ भाकडकथा आहे. एक तर गाय त्याला जवळ येऊ देणार नाही आणि दूध प्यायलाच तर दात लागून गाय मरण पावेल.
समज: सापाला संगीत/नागीण धुन आवडते. साप पुंगीच्या तालावर डोलतो.
सत्य: सापाला कान नसतात. त्याला कुठल्याही प्रकारचे संगीत आवडत नाही.
जमिनीच्या कंपनांमुळे त्याला शत्रू
च्या हालचालींची जाणीव होते.
समज: सापाच्या डोक्यावर नागमणी असतो.
सत्य: चित्रपटातून सापाचे अवास्तव चरित्र रंगवले गेले आहे. धनावरचा साप ही केवळ एक कल्पना आहे.
समज: साप डुख धरतो. सापाला दूरचे दिसत नाही. त्याला चेहरा लक्षात ठेवता येत नाही. त्यामुळे साप डुख धरतो हा समज चुकीचा आहे.
म्हणून सापाला मारू नका. जवळच्या सर्पमित्रांचा मोबाईल नंबर नेहमी सोबत
किंवा आपल्या डायरीत असू द्या. हजारो उंदरांना खाऊन शेतकऱ्यांचे होणारे फार मोठे नुकसान साप कमी करतो. त्यामुळे
सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.
समज: नाग-नागीण इच्छाधारी असतात. साप अमर असतात.
सत्य: ही फक्त एक कल्पना आहे. वास्तवात इच्छाधीरी साप ही गल्लाभरू सिनेमांची पैसा कमविण्याची अवास्तव कल्पना आहे. ते अस्तित्वात नाही.
सापाच्या भारतातील विषारी जाती-
१) नाग
२) फुरसे
३) घोणस
४) मण्यार
इतर सर्व साप बिनविषारी आहेत.
सर्प दंश झाल्यास तत्काळ प्रथमोपचार करून इस्पितळात दाखल करावे.
🐍🐍🐍
बापुसाहेब सोनवणे

सर्पदंश

विषारी साप चावल्यावर त्यावर उतारा वा उपाय म्हणून प्रतिविष टोचावे लागते. हे प्रतिविष भारतात ‘हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई’ या संस्थेत तयार केले जाते. या प्रतिविषामुळे सर्पविषाचे उदासिनीकरण होते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हे प्रतिविष १० मिली. शिरेतून लवक्ररात लवक्रर द्यावे. एका तासाने तिच्यात विषबाधेची लक्षणे आढळत असल्यास पुन्हा प्रतिविषाची दुसरी मात्रा द्यावी. फुरसे चावल्यास सर्पदंशाच्या जखमेभोवती थोडे प्रतिविष टोचावे लागते, त्यामुळे जखम चिघळत नाही. विषबाधेची लक्षणे जोपर्यंत आढळतात, तोपर्यंत दर दोन तासांनी प्रतिविषाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) द्यावी लागतात.
प्रतिविष तयार करताना तगड्या घोड्यांना नाग, मण्यार, घोणस व फुरसे यांचे सौम्य विष विद्राव म्हणून टोचतात. त्यामुळे घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके (अँटिबायॉटिक) तयार होतात. ती सर्पविषाचा परिणाम नष्ट करू शकतात. घोड्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके तयार झाल्यावर अशा घोड्याचे रक्त काढून यातून रक्तद्राव वेगळा करतात. हा द्राव सुकवितात. त्याची भुकटी (पावडर) तयार करतात. ही भुकटी सर्वसाधारण तपमानात ५-६ वर्षे उपयोगात आणता येते. १० मिली.च्या काचेच्या कुपीतून ती दवाखान्यात उपलब्ध असते. ॲलर्जी असलेल्या व्यक्तीस प्रतिविष टोचल्यास अगोदर ॲड्रेनॅलीन हे औषध टोचावे लागते.
सर्पदंश कसा टाळावा
सर्पदंश टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी : (१) रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. (२) अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे; त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. (३) साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता असते. (४) घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. (५) घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील,तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. (६) घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये, केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात. (७) झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये. (८) मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात. (९)जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत